अमेरिकेचे अर्थतज्ञ श्री रिचर्ड थेलर यांना त्यांनी वर्तणुकीच्या अर्थशास्त्रात केलेल्या कामगिरीबद्दल नुकतेच नोबेल पारितोषक देण्यात आले. आधुनिक पाश्चात्य अर्थशास्त्रात सामान्यपणे स्वार्थ साधण्याच्या वर्तणुकीला मान्यता आहे. अर्थव्यवहारातील मानव हा समजदारीने आपला स्वार्थ साधतो ह्या गृहितकावर अर्थशास्त्र उभे आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. थेलर ह्यांचे वर्तणुकीचे अर्थशास्त्र हे मानायला तयार नाही. त्यांच्या मते वास्तविक व्यवहारात मानव हा असा समजदारीने वागत नाही. बऱ्याच वेळा खूप पर्याय दिले तर त्याच्या हातून चूक होण्याचीच शक्यता असते म्हणून पर्याय देताना नीट विचार झाला पाहिजे. त्यातून इष्ट पर्यायाकडे लोकांना हळुवारपणे ढकलावे (nudging), अशाने लोक इष्ट निर्णय घेण्याची शक्यता वाढते असे मानणारे हे वर्तणुकीचे अर्थशास्त्र आहे. एका दृष्टीने भारतीय चिंतनाच्या काहीसा जवळ जाणारा हा पैलू आहे असे म्हणता येईल.
भारतीय चिंतन मानवाला पूर्णपणे स्वार्थाच्या आधीन मानत नाही तर अज्ञानाच्या आधीन मानते. अज्ञान दूर झाले तर मानव आपले हित जाणेल व तेच समाज धारणेत उपयोगी ठरेल. त्यामुळे अज्ञान दूर झाले पाहिजे व त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असा भारतीय चिंतनाचा आग्रह आहे. अर्थात अर्थशास्त्रात पर्यायांची माहिती पुरवली म्हणजे अज्ञान दूर होते व विक्रेत्याची जबाबदारी संपली असे मानले जाते व जाहिरातबाजीने मन कलुषित करण्याचा प्रयत्न केला जातो. भारतीय चिंतन ह्याच्या पुढे जाऊन व्यक्तीला समाजहिताची दृष्टी देते व समाज धारणेचा मार्ग खुला करते.
पाश्चिमात्य अर्थशास्त्र व्यक्तीला स्वार्थी बनवते व सरकार कडून समाजधारणेची व समाजहिताची अपेक्षा ठेवते. कंपन्यांना इच्छित निर्णय लोकांनी घ्यावेत यासाठी उपयोगी पडणारे वर्तणुकीचे अर्थशास्त्र समाजधारणेत तोटके पडण्याचीच जास्त शक्यता आहे. भारतीय मानसशास्त्राची जोड दिली तर कदाचित ते पूर्णत्वाला जाऊ शकेल. वर्तणूक प्रभावित करणे फक्त आर्थिक क्षेत्रातच आवश्यक नसते तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाचे आहे हे मान्य व्हावे. आणि त्यासाठी मानव मानसिकदृष्ट्या प्रगल्भ होणे गरजेचे आहे जेणे करून व्यक्तिगत स्वार्थापेक्षा त्याला समाजहित महत्त्वाचे वाटले पाहिजे. यासाठी एकात्मतेची संकल्पना सतत पुढे ठेवली पाहिजे. व्यक्तिगत स्वार्थ साधल्याने मानव फक्त भोगवादी होत जाईल व ते समाज धारणेत बाधा टाकणारे असेल. एकात्मतेच्या जाणीवेतून आलेली प्रगल्भता सर्वांचे हित साधणारी असेल व समाजधारणेत उपयुक्त ठरेल असे म्हणता येते. वर्तणुकीचे अर्थशास्त्र भारतीय चिंतनाचा आधार घेत वाटचाल करेल तर ते निश्चित उपयोगी ठरेल असे वाटते.
भारतीय चिंतन मानवाला पूर्णपणे स्वार्थाच्या आधीन मानत नाही तर अज्ञानाच्या आधीन मानते. अज्ञान दूर झाले तर मानव आपले हित जाणेल व तेच समाज धारणेत उपयोगी ठरेल. त्यामुळे अज्ञान दूर झाले पाहिजे व त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असा भारतीय चिंतनाचा आग्रह आहे. अर्थात अर्थशास्त्रात पर्यायांची माहिती पुरवली म्हणजे अज्ञान दूर होते व विक्रेत्याची जबाबदारी संपली असे मानले जाते व जाहिरातबाजीने मन कलुषित करण्याचा प्रयत्न केला जातो. भारतीय चिंतन ह्याच्या पुढे जाऊन व्यक्तीला समाजहिताची दृष्टी देते व समाज धारणेचा मार्ग खुला करते.
पाश्चिमात्य अर्थशास्त्र व्यक्तीला स्वार्थी बनवते व सरकार कडून समाजधारणेची व समाजहिताची अपेक्षा ठेवते. कंपन्यांना इच्छित निर्णय लोकांनी घ्यावेत यासाठी उपयोगी पडणारे वर्तणुकीचे अर्थशास्त्र समाजधारणेत तोटके पडण्याचीच जास्त शक्यता आहे. भारतीय मानसशास्त्राची जोड दिली तर कदाचित ते पूर्णत्वाला जाऊ शकेल. वर्तणूक प्रभावित करणे फक्त आर्थिक क्षेत्रातच आवश्यक नसते तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाचे आहे हे मान्य व्हावे. आणि त्यासाठी मानव मानसिकदृष्ट्या प्रगल्भ होणे गरजेचे आहे जेणे करून व्यक्तिगत स्वार्थापेक्षा त्याला समाजहित महत्त्वाचे वाटले पाहिजे. यासाठी एकात्मतेची संकल्पना सतत पुढे ठेवली पाहिजे. व्यक्तिगत स्वार्थ साधल्याने मानव फक्त भोगवादी होत जाईल व ते समाज धारणेत बाधा टाकणारे असेल. एकात्मतेच्या जाणीवेतून आलेली प्रगल्भता सर्वांचे हित साधणारी असेल व समाजधारणेत उपयुक्त ठरेल असे म्हणता येते. वर्तणुकीचे अर्थशास्त्र भारतीय चिंतनाचा आधार घेत वाटचाल करेल तर ते निश्चित उपयोगी ठरेल असे वाटते.