काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान केले होते की “जनतेला सर्व फुकट हवे आहे व राजकारणी तर तयारच आहेत... ”. मतदारांचे लाड पुरवण्याची ही वृत्ती खरेच काळजी करण्याइतकी वाढली आहे. फुकटेगिरी हा नेत्यांचा व लाभार्थींचा एक प्रकारे सामाजिक भ्रष्टाचार आहे.
चारित्र्यनिर्माणाच्या ह्या प्रश्नावर सुयोग्य शिक्षण हा एक जगन्मान्य उपाय आहे. कुटुंब, समाज व यांच्या माध्यमांतूनही संस्कार होत असतात. मुळात आईवडिलांच्या गुणसूत्रातूनच व्यक्तीचे गुणसूत्र जन्मते व असे जन्मजात गुण प्रभावी असतात. तरीही वरील तिन्ही गोष्टींतून होणारे बाह्यसंस्कारही तितकेच प्रभावी असतात.
पण आपल्या देशात स्वातंत्र्यानंतर शिक्षणातून संस्कार देण्याला भोंगळ सेक्युलरबाजीतून खीळ बसली. पाश्चात्यांचे सर्वकाही स्वीकार्य व आपले पारंपारिक (म्हणजे हिंदूंचे) ते सर्व त्याज्य या सेक्युलर-डाव्या विचाराने राष्ट्राचे अतोनात नुकसान केले आहे. त्यातून आजही बाहेर न पडल्यास फार उशीर झालेला असेल.
आपल्यापाशी असलेल्या गुणसूत्र-संस्कार पूंजीतून आजही तर्काधारित विचाराच्या जोरावर चांगले-वाईट योग्य-अयोग्य निवड आपण जितकी करू शकतो तितकी करावी. राजकीय पुढा-यांनी समाजाला फुकटेगिरीच्या मार्गावर लालूच दाखवून नेण्याचे थांबवावे. सर्वच क्षेत्रांतील समाजनेत्यांनी स्वप्रयत्नाने, स्वावलंबनाने, आपल्या पुरुषार्थाने प्रगती करण्याचे संस्कार आवर्जून द्यावेत.
पं. दीनदयाळांनी एकात्म मानव दर्शनाचा मार्ग दाखविला आहे व त्यावर मंत्रीमहाशयांचा विश्वास असावा असे मानण्यास जागा आहे. तेव्हा त्यांनी शिक्षणात सुयोग्य बदल करावेत. उरलेल्या दोन-अडीच वर्षांत सकारात्मक बदल दृश्यमान होतील व त्यांची मतदार मान्यता वाढू शकेल.
स्वावलंबन, आत्मबल व पुरुषार्थप्रवणता दर्शविणारी एक घटना पहा. न्यायमूर्ति रामशास्त्री एका गरीब ब्राह्मण कुटुंबात जन्मले. घरच्या गरीबीमुळे मामांच्या घरी आश्रय घेण्याची वेळ लहान वयातच आली. पेशव्यांच्या रमण्यात लहान विद्यार्थ्यांना दक्षिणा वाटपाचा कार्यक्रम होता. मामांच्या दडपणामुळे उनाड प्रवृत्तीच्या रामने काही बाही खोटे सांगून दक्षिणा घेतली परंतु नंतर टोचणी लागून ती परत दिली व खरे काय ते सांगीतले. त्यानंतर मात्र त्यांच्यात आमुलाग्र बदल होऊन परिश्रमाने शिक्षण घेऊन ते उच्च पदावर पोहोचले. आईने दिलेले संस्कार वरचढ ठरले हे महाराष्ट्राचे भाग्य.
आपले आई, वडील, शिक्षक यांजकडून मिळणा-या संस्कारांबरोबरच सर्वच क्षेत्रांतील पुढा-यांच्या विचारांचा व वर्तनाचाही परिणाम समाजमानसावर होत असतो. त्याचे मोठे उदाहरण म्हणजे नोव्हेंबर 2016 ची नोटबंदी होय. विरोधक, पुढारी, वर्तमानपत्रे, TV चॅनल यांचा टीकेचा भडिमार होऊनही समाज मन स्थिरविचारी राहिले.
आपला समाज लाचार, याचक व फुकट्या मानसिकतेचा न बनता तो पुरुषार्थी बनावा यासाठी नेत्यांनी, शिक्षकांनी, पालकांनी व सर्व संस्कार माध्यमांनीही काळजी घेतल्यास ते अशक्य नाही.
चारित्र्यनिर्माणाच्या ह्या प्रश्नावर सुयोग्य शिक्षण हा एक जगन्मान्य उपाय आहे. कुटुंब, समाज व यांच्या माध्यमांतूनही संस्कार होत असतात. मुळात आईवडिलांच्या गुणसूत्रातूनच व्यक्तीचे गुणसूत्र जन्मते व असे जन्मजात गुण प्रभावी असतात. तरीही वरील तिन्ही गोष्टींतून होणारे बाह्यसंस्कारही तितकेच प्रभावी असतात.
पण आपल्या देशात स्वातंत्र्यानंतर शिक्षणातून संस्कार देण्याला भोंगळ सेक्युलरबाजीतून खीळ बसली. पाश्चात्यांचे सर्वकाही स्वीकार्य व आपले पारंपारिक (म्हणजे हिंदूंचे) ते सर्व त्याज्य या सेक्युलर-डाव्या विचाराने राष्ट्राचे अतोनात नुकसान केले आहे. त्यातून आजही बाहेर न पडल्यास फार उशीर झालेला असेल.
आपल्यापाशी असलेल्या गुणसूत्र-संस्कार पूंजीतून आजही तर्काधारित विचाराच्या जोरावर चांगले-वाईट योग्य-अयोग्य निवड आपण जितकी करू शकतो तितकी करावी. राजकीय पुढा-यांनी समाजाला फुकटेगिरीच्या मार्गावर लालूच दाखवून नेण्याचे थांबवावे. सर्वच क्षेत्रांतील समाजनेत्यांनी स्वप्रयत्नाने, स्वावलंबनाने, आपल्या पुरुषार्थाने प्रगती करण्याचे संस्कार आवर्जून द्यावेत.
पं. दीनदयाळांनी एकात्म मानव दर्शनाचा मार्ग दाखविला आहे व त्यावर मंत्रीमहाशयांचा विश्वास असावा असे मानण्यास जागा आहे. तेव्हा त्यांनी शिक्षणात सुयोग्य बदल करावेत. उरलेल्या दोन-अडीच वर्षांत सकारात्मक बदल दृश्यमान होतील व त्यांची मतदार मान्यता वाढू शकेल.
स्वावलंबन, आत्मबल व पुरुषार्थप्रवणता दर्शविणारी एक घटना पहा. न्यायमूर्ति रामशास्त्री एका गरीब ब्राह्मण कुटुंबात जन्मले. घरच्या गरीबीमुळे मामांच्या घरी आश्रय घेण्याची वेळ लहान वयातच आली. पेशव्यांच्या रमण्यात लहान विद्यार्थ्यांना दक्षिणा वाटपाचा कार्यक्रम होता. मामांच्या दडपणामुळे उनाड प्रवृत्तीच्या रामने काही बाही खोटे सांगून दक्षिणा घेतली परंतु नंतर टोचणी लागून ती परत दिली व खरे काय ते सांगीतले. त्यानंतर मात्र त्यांच्यात आमुलाग्र बदल होऊन परिश्रमाने शिक्षण घेऊन ते उच्च पदावर पोहोचले. आईने दिलेले संस्कार वरचढ ठरले हे महाराष्ट्राचे भाग्य.
आपले आई, वडील, शिक्षक यांजकडून मिळणा-या संस्कारांबरोबरच सर्वच क्षेत्रांतील पुढा-यांच्या विचारांचा व वर्तनाचाही परिणाम समाजमानसावर होत असतो. त्याचे मोठे उदाहरण म्हणजे नोव्हेंबर 2016 ची नोटबंदी होय. विरोधक, पुढारी, वर्तमानपत्रे, TV चॅनल यांचा टीकेचा भडिमार होऊनही समाज मन स्थिरविचारी राहिले.
आपला समाज लाचार, याचक व फुकट्या मानसिकतेचा न बनता तो पुरुषार्थी बनावा यासाठी नेत्यांनी, शिक्षकांनी, पालकांनी व सर्व संस्कार माध्यमांनीही काळजी घेतल्यास ते अशक्य नाही.