वयं पंचाधिकं शतम् - रवीन्द्र महाजन

दै. लोकसत्तेतील बातमीप्रमाणे अमेरिकेत बर्कले येथे कॅलिफोर्निया विद्यापीठात बोलताना

“..... नोटाबंदी, वाढता हिंसाचार, जीएसटी यासह अनेक मुद्द्यांवरुन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. ‘हिंसा, द्वेष आणि ध्रुवीकरणाचे राजकारण यांनी भारतात डोके वर काढले आहे. हे मुद्दे देशासाठी नवे असून, हाच ‘न्यू इंडिया’ आहे,’ अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी मोदींवर शरसंधान साधले. नोटाबंदीचा निर्णय, कथित गोरक्षकांकडून सुरु असलेला हिंसाचार, द्वेषाचे राजकारण अशा अनेक मुद्यांवरुन राहुल गांधींनी मोदी सरकारला लक्ष्य केले. ‘राजकारणातील ध्रुवीकरण अतिशय धोकादायक आहे. द्वेष, राग आणि हिंसा सगळ्यांनाच उद्ध्वस्त करेल. देशातील उदारमतवादी पत्रकारांच्या हत्या होत आहेत. सामान्य लोकांवर हल्ले केले जात असून दलितांना गायींची तस्करी केल्याच्या केवळ संशयावरुन संपवले जात आहे. गोमांस सेवन केल्याच्या संशयावरुन मुस्लिमांच्या हत्या सुरु आहेत....हिंसाचाराच्या घटना आता मुख्य प्रवाहाचा भाग झाल्या आहेत आणि हा प्रकार अतिशय भयंकर आहे…..”

परदेशात आपले पंतप्रधान, आपले सरकार यांच्यावर कडक टीका करणा-या व आपल्या देशाचे काळेकुट्ट चित्र रंगवणा-या राजकीय नेत्याचे पक्षांध लोक सोडल्यास कोणीही समर्थन करणार नाही. सध्या ज्यांची जन्मशताब्दी चालू आहे त्या पं. दीनदयाळजींचे या बाबतीत स्मरण होते. परदेशात दौ-यावर असताना त्यांना तत्कालीन सरकारच्या धोरणांवर प्रश्न विचारण्यात आले. पण त्यांनी नम्रपणे सांगितले की परदेशात आम्ही राष्ट्रीय सरकारच्याच बाजूने आहोत. धोरणात्मक मतभेद हे आम्ही आमच्या राष्ट्रीय व्यासपीठावर मांडू.

आनंदाची गोष्ट म्हणजे असाच विवेक ज्यांच्याकडून फारशी अपेक्षा नसेल अशा लालुप्रसाद यादवांनीही केला होता. पत्रकार व भाजपचे माजी खासदार बलबीर पुंज यांनी एका बैठकीत नुकतेच सांगितले की 2002 साली अटलजी पंतप्रधान असताना ते एका संसदीय शिष्टमंडळात पाकिस्तानला गेले होते. त्यांच्याबरोबर लालूजी व कॉंग्रेसचे मणीशंकर अय्यरही होते. लाहोर येथे टीव्ही कार्यक्रमात त्या तिघांना भारतीय राजकारणारवर उलटे सुलटे प्रश्न विचारले जात होते. लालूजींना प्रश्न विचारला गेला तेव्हा ते म्हणाले की “हम सब एक हैं, बलबीर जी ही इसका जबाब देंगे”. मणी शंकर अय्यरांनी मात्र भारत सरकारच्या धोरणांवर खरपूस टीका केली.

एकंदरच राजकारणापेक्षा राष्ट्रकारण हे मोठे आहे व राष्ट्रीय प्रतिमा व राष्ट्रीय हित जपणे हे आपले कर्तव्य आहे ही जाणीव स्वार्थ व पक्षमोह यांमुळे कमी होत आहे. म्हणूनच युधिष्ठिराने आपले भाऊ भीम व अर्जून यांना संकटात सापडलेल्या दुर्योधनाल वाचविण्यासाठी केलेला ‘वयं पंचाधिकं शतम्’ हा उपदेश सर्व काळात सर्व सत्ताधा-यांनी सतत स्मरत रहाण्याची आवश्यकता आहे. पं. दीनदयाळांनी अशाच भावनेतून सर्व पक्षांना साधारणपणे स्वीकारार्ह होऊ शकेल अशा भारतीय चिंतनावर आधारित ‘एकात्म मानव दर्शन’ या राष्ट्रीय तत्त्वज्ञानाची रूपरेषा मांडली. तपशीलात वेगवेगळी मते असू शकतात पण राष्ट्रहिताची म्हणचेच जनहिताची सर्वांची एक दृष्टी असेल तर राष्ट्र चांगली प्रगती करू शकते. आजच्या परिस्थितीत हे साधण्यासाठी आदरणीय राष्ट्रपतींनी सर्वपक्षीय बैठक पुरेशा पूर्वतयारीनिशी बोलावून राजकारणात असलेल्या लोकांसाठी परदेशदौ-यासाठी आचारसंहिता करण्याचा प्रयत्न केल्यास ते देशहिताचे होईल. परदेशांमध्ये भारताची प्रतिमा उजळ राहील. असाच प्रयत्न भारतीय चिंतन व परिस्थितीवर आधारित विकासाची मार्गदर्शक आधारभूत तत्त्वे यांच्याविषयी राष्ट्रीय सहमती करण्याचा आदरणीय राष्ट्रपतींनी करावा असे सुचवावे वाटते.

3 comments:

  1. मुद्दा योग्यच आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजवर परदेशात ठिकठिकाणी केलेल्या भाषणांमध्ये भारतात आजवर बेकारी, दारिद्र्य, अज्ञान, अस्वच्छता, भ्रष्टाचार इ. इ. चे साम्राज्य कसे होते आणि आता मी ते सारे बदलून टाकण्याचा कसा निश्चय केला आहे, तुम्ही मला साथ दया, असे जे आवाहन केले होते ते काय भारताचा गौरव वाढविणारे होते, असे म्हणायचे काय?

    ReplyDelete
    Replies
    1. Prakash Sahasrabuddhe16 September 2017 at 07:09

      Let us see PM's comments in the context. Rightly or wrongly, image of India in international circles was/ is that of poor infrastructure, corruption, unfriendly business environment, and so on. It was necessary to dispel this notion to attract FDI. Whether FDI is desirable or otherwise is another debate. Many and this dispensation thinks we need FDI. PM's comments must be seen in this context, and results are there for all to see. Will flow of FDI help BJP alone and not the nation as whole? What national interest is served by Rahul Gandhi's diatribe not only against PM but the prevailing environment in India?

      Delete
    2. In NaMo's speeches, you could find the positive message for change, aspiration for development, resolve for well-planned action. He is delivering on those promises.
      Did you find any of these things in RaGa's recent speeches in US? He sounded more like a cry-baby. Only complaining about NaMo and BJP. Why did he not put any alternative action-plan?

      Delete