हे असे एकात्म मानव दर्शन ------ कविः डॉ अभिजित फडणीस

साम्यवादाचा फुगा फुटला
भांडवलशाहीला सामान्य विटला
आता हवे पर्यायी चिंतन
देते आम्हा एकात्म मानव दर्शन

भांडवलशाहीतून स्वार्थ निपजला
साम्यवादाने मनुष्य चिरडला
आमच्या ऋषींचे विचार चिरंतन
त्यावर आधारित एकात्म मानव दर्शन

समाजाची त्यांनी रचना केली
अधिकारांची विभागणी केली
दायित्व अधिकारांहून महान
हेच खरे एकात्म मानव दर्शन

धर्मज्ञान आहे तिथे सत्ता नको
सत्ता आहे तिथे स्वार्थ नको
पैसा  आहे तिथे समाजाची जाण
हेच खरे एकात्म मानव दर्शन

गुण-कर्म जरी प्रत्येकाचे वेगळे असे
ध्येय मात्र सर्वांचे एकच जसे
श्रमाश्रमातून समाज उन्नयन
हेच खरे एकात्म मानव दर्शन

जाती पाती वर्ण आणि पंथभेद
वरवरती दिसती, अंतर्यामी एकजीव
अवयव अनेक, तरी एकत्र संजीवन
हेच खरे एकात्म मानव दर्शन

मानवाच्या भोगासाठी सृष्टी
समजूत इहवादाची खोटी
कंकरात ईश्वरी अधिष्ठान
हेच खरे एकात्म मानव दर्शन
केवळ स्वार्थ नसे जीवनमूल्य
अधिकारांपेक्षा कर्तव्याला मोल
प्रत्येक कृतीतून विश्वस्पंदन
हेच खरे एकात्म मानव दर्शन

मानव नसे केवळ पशूमात्र
दिव्यत्वाचा त्याला स्पर्श
करू त्याचे सम्यक जागरण
हेच खरे एकात्म मानव दर्शन

घेण्याचा नको देण्याचा विचार
व्यष्टीचाच नको समष्टीचा विचार 
सृष्टी आणि परमेष्टी चिरंतन
हेच खरे एकात्म मानव दर्शन

एकात्मता बंधुत्वाहून श्रेष्ठ
अद्वैत द्वैताहून वरिष्ठ
भावनिक ऐक्याचे प्रतिपादन
हेच खरे एकात्म मानव दर्शन

पददलितांचे उत्थान साधूया
परदुःखातच आपले दुःख पाहूया
जनताजनार्दन म्हणजे नारायण
हेच खरे एकात्म मानव दर्शन
पंथ निरपेक्षता हवी साची
ईश्वराची भक्ती यथामती
पण राष्ट्राला धर्माचे अधिष्ठान
हेच खरे एकात्म मानव दर्शन

धर्म म्हणजे राष्ट्राची चिती
विराट राष्ट्राची संस्कृती
चिती  आणि विराटाचे जागरण 
हेच खरे एकात्म मानव दर्शन
राजसत्तेची इतिकर्तव्ये अनेक
व्यक्तीचे उत्थान समाजधारणा नेक
प्रजेचे स्वपुत्रवत पालन
हेच खरे एकात्म मानव दर्शन

शिक्षण नसे केवळ पुस्तकी ज्ञान
आंतरिक क्षमतांचे त्यात विकसन
व्यक्ती बने राष्ट्रीय सद्गुणांची खाण
हेच खरे एकात्म मानव दर्शन

कायद्यापेक्षा स्वयंशिस्त श्रेष्ठ
संस्काराने नराचा नारायण हे उद्दिष्ट
जीवनाचं आमूलाग्र परिवर्तन
हेच खरे एकात्म मानव दर्शन

कलहापेक्षा प्रेम आणि अवलंबित्व
पश्चिम नि भारतीय विचार भिन्नत्व
वैविध्यता एकत्व सूत्र बंधन
हेच खरे एकात्म मानव दर्शन

विसंवाद नको संवाद हवा,
युद्ध नको बंधुभाव हवा
त्या साठी सबळ राष्ट्र निर्माण
हेच एकात्म मानव दर्शन

काम, क्रोध ह्रासाला कारण,
प्रेम आणि त्याग सत्वाचे जागरण
मैं नही तू ही विचार संवर्धन
हेच एकात्म मानव दर्शन

व्यक्तीचा विचार नको अर्धवट :
शरीर, मन, बुद्धी, आत्मा यांचा हा घट
या साऱ्यांचे सम्यक चिंतन
हेच एकात्म मानव दर्शन

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष
चारी पुरुषार्थांची सांगड श्रेष्ठ
धर्माचे महत्व अनन्य साधारण
हेच एकात्म मानव दर्शन

धर्म राज्याहुन ही श्रेष्ठ
धर्म म्हणजे पंथ नव्हे जाण
धर्म राष्ट्राचालनाचा प्राण
हेच एकात्म मानव दर्शन

राजशक्ती अतिरेक, तर धर्माचा क्षय
हेच साम्यवादाच्या ह्रासाचे कारण
समाजाभिमुख व्यक्तीचे निर्माण,
हेच एकात्म मानव दर्शन

राज्यशक्ती आणि राष्ट्र आहेत भिन्न
पश्चिमेने केली गल्लत समान लेखून
राज्य अस्थायी, राष्ट्रशक्ती असे चिरंतन
हेच एकात्म मानव दर्शन

जन्मलेल्या अन्न हवे,
कमवेल त्याने द्यायला हवे
वसुधैव कुटुंबाची जाण
हेच एकात्म मानव दर्शन

मनुष्य घटक नसे केवळ आर्थिक
'
जीवो ब्रहमैव ना परः' ऐक्य उत्कट
करूया त्याला नराचा नारायण
हेच एकात्म मानव दर्शन

स्वदेशी, विकेंद्रीकरणावर भर
तंत्रज्ञानाबरोबर मानवीय विचार
स्वार्थ नव्हे, अंत्योदयाचा निर्धार
हेच एकात्म मानव दर्शन
(एकात्म मानव दर्शन संमेलन ठाणे 24.9.2017)

2 comments:

  1. nice extract

    ReplyDelete
  2. एकात्म मानव दर्शन थोडक्यात व्यक्त करणे अवघड आहे. पण या दिर्घ काव्यात त्याचे उत्तम दर्शन कवी ने करुन दिले आहे. डॉ. अभिजित फडणीस यांचे अभिनंदन.

    ReplyDelete